पुणे मेट्रो लाईव्ह :
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगी झेंडे लावण्याचा संकल्प केला जात असून ' हर घर तिरंगा ' संकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये चीन वरून तयार झालेले झेंडे वापरून देश प्रेमाला गालबोट लावू नये, असे आवाहन भारत फ्लॅग फाउंडेशनने केले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे आवाहन करण्यात आले आहे.
चिनमधून आलेले तिरंगा ध्वज कोणी विकू नये ,खरेदी करू नये, कारण हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. चीन वरून आलेल्या झेंड्यांना बंदी केली पाहिजे . तशा आशयाचा संदेश फाउंडेशनने तयार केला असून तो नागरिकांनी डीपी, स्टेटस म्हणून सोशल मीडियावर ठेवावा ,असे आवाहन देखील फाउंडेशनने केले आहे
भारतामध्ये सर्वसामान्य कारागीर, गरीब कुटुंबे, छोटे कारखानदार ध्वज निर्मिती करत असतात. बचत गटांमध्ये महिला हे काम करतात. चीन मधून आलेल्या झेंड्यांमुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ,सामाजिक संस्था मोफत ध्वज वाटप करत आहेत. त्यांनी देखील ध्वज चीनमधून आलेले नाहीत याची खात्री करावी. भारतीय ध्वज संहिता आणि इतर माहिती असलेली पत्रके भारत फाउंडेशनने तयार केली असून 'मुरुडकर झेंडे वाले ' यांच्याकडून ती मोफत मिळू शकतील. त्यासाठी भारत फ्लॅग फाउंडेशनच्या ९८२२०१३२९२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment