Skip to main content

Posts

Showing posts with the label विशेष लेख

हर घर मे तिरंगा आणि देश प्रेम

पुणे मेट्रो लाईव्ह : आजादी का अमृत महोत्सव  अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022  प्रत्येक घर ,ऑफीस ,शाळा सगळ्या ठिकाणी तिरंगा उभारण्यासाठी घर घर  तिरंगा अभियान चालवण्यात येत आहे त्याबद्दल काही गोष्टी मला मनापासून वाटतात .त्या आपल्या सोबत शेअर करत आहे .  घर घर तिरंगा याअंतर्गत प्रत्येक घर ,ऑफिस, शाळा या ठिकाणी तिरंगा आपण फडकवणार आहोत पण ह्या तिरंग्याचा अभिमान फक्त दोन दिवसासाठी आहे का ? आणि दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑगस्टला त्या तिरंग्याचे काय होणार?  काही तिरंगे हे कागदी असतील, काही तिरंगे हे प्लास्टिकचे असतील, काही तिरंगे हे कापडाचे असतील पण दोन दिवसांचे अभियान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या तिरंग्याच काय होणार..? तर मला असे वाटते की ...दोन दिवसाचे घर घर तिरंगा अभियान झाल्यानंतर पुढे तो तिरंगा रस्त्यावर फेकला जाऊ नये, तिरंगा कोणाच्या पाया खाली येता कामा नये .तिरंग्याचा अवमान होता कामा नये असे मला वाटते .त्यामुळे घर घर तिरंगा ठीक आहे पण प्रत्येक घराघरातील माणसाच्या मनामध्ये तुम्ही तिरंगा कसा फडकवणार ?फक्त दोन दिवस घरावरती तिरंगा फडकवून खरंच देशप्रेमाची ...

मेट्रो प्रकल्प तोट्यात

पुणे मेट्रो लाईव्ह : संसदेच्या स्थायी समितीने विविध महानगरातील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतलेला अहवाल संसदेला २७ जुलै २२ रोजी सादर केला.या अहवालातून देशातील सर्वच मेट्रो प्रकल्प तोट्यात गेलेले आहेत हे अधोरेखित करून याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यातील बहुतांश प्रकल्प हे २०१६-१७ पासून सुरू झालेले होते. त्यामुळे या तोट्याचे खापर केवळ कोरोनावर फोडता येणार नाही. तसेच 'मेट्रो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जातो. त्यात आर्थिक गणित ,प्रवासी संख्या ,कर्जाची परतफेड आदी साऱ्यांचा आढावा घेतला जातो. पण सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना सरकारी यंत्रणांचे नियोजन चुकल्याचा ठपका संसदीय समितीने ठेवला आहे.' मेट्रो रेल्वेच्या एक किलोमीटर मार्गासाठी किमान पंचवीस कोटी रुपये खर्च येत असतो. तसेच एका स्थानकाच्या उभारणीसाठीही तेवढाच खर्च येत असतो. हे जगभरचे मेट्रो अर्थकारण आहे.हा खर्च प्रवासी आणि जाहिरातीचे उत्पन्नातून मिळविणे अपेक्षित असते. पण मेट्रोबाबत गेल्या पाच सहा वर्षात या दोन्हीतही आनंदी आनंद आहे. विकासाची दिवास्वप्ने दाखवण्याच्या नादात हवेत राहणाऱ्यांना जमिनी ...

शब्दाला जागणारे सर्वसमावेशक नेतृत्व !

पुणे मेट्रो लाईव्ह : हल्ली राजकारणात शब्दाला जागणारे नेतृत्व अपवादानेच बघायला व अनुभवायला मिळते.याउलट सत्तेच्या स्वार्थासाठी जनतेचा विश्वासघात करणा-यांची माञ मोठी गर्दी आहे.त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा राजकारणा बरोबरच नेते मंडळींच्या प्रामाणिक कार्यावरील विश्वास कमी होत चालला आहे,हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही.असे असले तरी आपल्या प्रामाणिक जनहिताच्या कार्यातून राजकारणातून समाजकारण करता येते ,हे दाखवून देणारे माञ जनतेच्या मनात आदराचे भक्कम स्थान निर्माण करतात.अशा कार्यकुशल मंडळींना जनतेचे मिळणारे पाठबळ हीच त्यांची मोठी ताकद असते.याच ताकदीच्या बळावर व आपल्या प्रशासकीय कामकाजातील अनुभवी कौशल्याच्या जोरावर  ते प्रशासनाकडून समाजातील विविध प्रलंबित मुलभूत विकासकामे मार्गी लावण्यात कमालीचे यशस्वी ठरतात.याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे राजकारणात राहूनही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे व सर्वसामान्यांचा आपला हक्काचा माणूस अशी सर्वमान्य विश्वासार्ह ओळख निर्माण केलेले वस्ञनगरीचे सुपूञ माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार.ते केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपचे समर्थक असले तरीही व...