Skip to main content

Posts

Showing posts from July 13, 2022

पंचगंगा नदीवरील पाणी पुलावर आल्याने शिरढोण कुरुंदवाड संपर्क तुटला

शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला शिरढोण : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिरढोण- कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर बुधवारी सकाळी पाणी आले आहे. त्यामुळे शिरढोण कुरुंदवाड संपर्क तुटला आहे. तर शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला आहे. दरम्यान पुराच्या पाण्याला गती असल्याने व त्या पाण्यातून वाहतूक सुरु असल्याने कुरुंदवाड पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरीकेटस लावून वाहतूकीसाठी रस्ता बंद केला आहे. वाहतूक रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, मंडल अधिकारी डी. बी. गायकवाड, तलाठी रवी कांबळे, पोलिस पाटील अनुराधा जाधव, सरपंच बाबू हेरवाडे रस्त्यावर गस्त घालत होते.इंचलकरंजीहून  कुरुंदवाडला जाण्यासाठी शिरढोण मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक असते. मात्र पुलावर पाणी आल्याने व पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा ते बारा किलोमीटर परत जावून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे क...

पुणे आणि परिसरात आगामी चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत पुणे मेट्रो लाईव्ह : जीलानी उर्फ मुन्ना शेख :   पुणे आणि परिसरात आगामी चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पुढील तीन दिवस शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.या आदेशानुसार, गुरुवार, 14 जुलै 2022 ते रविवार, 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पर्यटक, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या पर्यटनस्थळांवर कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.कोणकोणत्या ठिकाणी आदेश लागू ? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार खालील पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू असेल असे असतील प्रतिबंध पाच किंवा पाच ...

बेभान सुटलेल्या महागाईच्या राक्षसाच्या विरोधात 'आप' पुणे कडून आज काढण्यात आली गॅस सिलेंडरची व विजेची अंत्ययात्रा.

मोदी सरकार गेल्या ८ वर्षांत विकासाच्या गाडीला ब्रेक लावून महागाईची एक्सप्रेस मात्र सुसाट वेगाने पळवत आहे.  सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत  जिल्हाधिकारींना दिले पत्र. पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : बेभान सुटलेल्या महागाईच्या राक्षसाच्या विरोधात 'आप' पुणे कडून आज काढण्यात आली गॅस सिलेंडरची व विजेची अंत्ययात्रा. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत  जिल्हाधिकारींना दिले पत्र मागील काही वर्षातील वाढत्या महागाईचे अक्राळ-विक्राळ रूप बघून सर्वसामान्य जनता आज हवालदिल झाली आहे. "बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार" हे ब्रीदवाक्य घेऊन २०१४ साली सत्तेवर आलेले मोदी सरकार गेल्या ८ वर्षांत विकासाच्या गाडीला ब्रेक लावून महागाईची एक्सप्रेस मात्र सुसाट वेगाने पळवत आहे.  या बेभान सुटलेल्या महागाईच्या राक्षसाचा निषेध म्हणून आम आदमी पार्टी (आप) ने सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून या प्रचंड भाववाढीचा कडाडून विरोध केला आजच्या अंत्ययात्रा द्वारे. ही गॅस सिलिंडर व विजेची *अंत्ययात्रा* मोलेदिना रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याप...

कोल्हापूर : 55 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग

पुणे मेट्रो लाईव्ह :   कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 137.11 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व शिरगांव, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील-  सुळे, पणुंद्रे व आंबर्डे असे 55 बंधारे पाण्याखाली आहेत.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसा...