सध्यस्थिती पाहता पुराचा धोका टळल्याच दिसत आहे.
पुणे मेट्रो लाईव्ह :
कोल्हापूर : गेल्या आठवडाभरा पासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता.आता गेल्या २४ तासापासून जरा पाऊस ओसरू लागला आहे. त्यामुळे सध्यस्थिती पाहता पुराचा धोका टळल्याच दिसत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर होऊ लागली आहे. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे .
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून घट होऊ लागली आहे. तसेच आठवडाभर गायब असलेल्या सूर्याचे दर्शन झाल्याने आणखी दिलासा मिळाला. आज सकाळी 10 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 37 फुट 9 इंच इतकी होती. पंचगंगेची इशारा पातळी 39 आहे, तर धोका पातळी 43 फुट आहे.
अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग
अलमट्टी धरणातून (almatti dam) आज सकाळी सकाळी 10 वाजल्यापासून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याआधी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर धरण प्रशासनाने धरणकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यामधील सर्वच नद्यांची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment