"अभिज्ञा म्हणाली बाबा म्हणून मोठया प्रमाणात झाडं लावली पाहिजे"
कव्हर स्टोरी....
एका लहान मुलीची पर्यावरणाच्या प्रती उत्तम कामगिरी
अन्वरअली शेख
पुणे मेट्रो लाईव्ह
देहूरोड दि.६ निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति प्रेम भावना व निसर्ग निर्मितीच्या महान कार्यात मग्न अशी ही देहूरोड शहराच्या केंद्रीय विद्यालय नंबर १.तिसरी मध्य शिकत असताना पर्यावरणाची काळजी घेतली आणि पर्यावरण संवर्धन, निसर्ग रक्षणाच्या बाबतीत,तेसच मानवतेच्या दृष्टीकोनातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिला (नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थने ) कार्याची दखल घेऊन कु.अभिज्ञा पंकज तंतरपाळे यांना संस्थच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे.
कु अभिज्ञा ची निसर्ग प्रति प्रेमाची कहाणी मागील दोन वर्षांपूर्वी जन्माला आली संपूर्ण जग कोरोना या भयंकर महामारी-शी झुंजत होता भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती,अनेक निष्पाप लोकं या आजारा मुळे मरण पावले,रोज टिव्ही न्युज मध्ये अनेक लोकांची मृत्यू ची बातमी येत होती आणि त्या मध्ये मुख्य कारण म्हणजे ऑक्सिजन (oxygen) च्या अभावामुळे लोकांचा मृत्यू होत होता,जेव्हा ही गोष्ट अभिज्ञा च्या लक्षात आली तेव्हा तिने तिच्या वडिलांना विचारले ऑक्सयजन (oxygen) कसे तयार होते?, आणि पर्यावरण म्हणजे काय? तिच्या वडिलांनी तिला उत्तर दिले झाडांच्या माध्यमातून सर्व मानवांना ऑक्सिजन मिळतो व
पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. या उत्तरा मुळे अभिज्ञा च्या मनात पर्यावरणाच्या प्रति प्रेम निर्माण झाले, *आणि अभिज्ञा म्हणाली बाबा म्हणून मोठया प्रमाणात झाडं लावली पाहिजे,*
अभिज्ञा ने एका क्षणाचाही विचार न करता तिच्या लहान हातांनी जमवलेल्या पैशांचा डबा (मनी बॉक्स ) फोडला आणि जमलेले सगळे पैसे तिच्या वडिलांना दिले व झाडं घेऊन या असे सांगितले, त्या दिवशी या कार्याची सुरुवात झाली आणि आज पर्यंत अभिज्ञा ने स्वतःहून 200 च्या वर झाडं लावली आहे, व रोज पाणी घालून झाडे जगवते, रोज शाळेत जाण्या पूर्वी झाडांना पाणी घालून शाळेत जाते पाऊसात पण पाणी टाकते कारण या पावसाच्या काळात माझी सवय चुकली नाही पाहिजे असा हा अभिज्ञा पंकज तंतरपाळे चा प्रवास या मुळे आज तिला निसर्ग कन्या या पुरस्काराने संबोधले गेले आहे.
संवेदनशील पिढी घडवायची असल्यास मुलांना निसर्ग अनुभवू दिला पाहिजे. केवळ अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय शिकवून उपयोग नाही. कोयीचे रूपांतर टप्प्याटप्प्याने आंब्याच्या झाडात कसे होते, हे निसर्गाचे रूप त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. अनुभवाच्या पातळीवर उतरत नाही तोवर त्यांना निसर्ग समजून घेता येणे शक्य नाही. मुलांच्या मनात रुजले तर ते मातीत रुजेल,
मनुष्य जंगल निर्माण करू शकत नाही. निसर्ग स्वतःच स्वतःची वाढ आणि कार्य करण्यात समर्थ आहे. परंतु मनुष्याचा निसर्गचक्रातील वाढत्या हस्तक्षेपामुळे हे चक्र खंडित होत आहे. लहान मुलांच्या निसर्गाविषयीच्या उत्सुकतेला दाबण्याऐवजी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment