पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसाने उघडीप दिल्याने गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असलेली पंचगंगा नदी आज पात्रात परतण्याची शक्यता आहे. पंचगंगेची पातळी 32 फुटांवर आली आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी वेगाने कमी होत असून आता केवळ 29 बंधाऱ्यांवर पाणी आहे. गेल्या 24 तासांमध्ये सहा फुटाने खाली आली. तर दुसरीकडे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र.6 हा एकमेव खुला असून सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदी गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असल्याने महापूराची टांगती तलवार होती. मात्र, चार दिवसांपासून दिलेल्या उघडीपमुळे संकटातून सुटका झाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु आहे. खालील बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा नदी-शिंगणापूर,राजाराम,सुर्वे,रुई,इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ भोगावती नदी-हळदी,सरकारी कोगे,राशिवडे, शिरगांव,खडक कोगे कासारी नदी- यवलूज,पुनाळ तिरपण,ठाणे आळवे वेदगंगा नदी- बस्तवडे व चिखली वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी दुधगंगा नदी- दत्तवाड...