Skip to main content

Posts

यूटय़ूब पाहून तरुणी आणि महिलांचे व्हॉट्सऍप हॅक करून त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱयाला अखेर अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.

  पुणे मेट्रो लाईव्ह : यूटय़ूब पाहून तरुणी आणि महिलांचे व्हॉट्सऍप हॅक करून त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱयाला अखेर अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. रवी बनावर्स दांडू असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात मोबाईल आणि 11 सीमकार्ड जप्त केले आहेत. रवी ज्या बँकेत काम करायचा तेथील महिलांना देखील त्याने अश्लील मेसेज पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीला फेब्रुवारी महिन्यात एक फोन आला. फोन करणाऱयाने आपण कॉलेजचा शिक्षक बोलत असल्याचे भासवले. शिक्षणासाठी कॉलेजचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करायचा आहे असे सांगून तरुणींकडून ओटीपी घेतला. ओटीपी घेतल्यानंतर त्याने तरुणीचे व्हॉट्सऍप हॅक केले. त्यावरून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. याप्रकरणी तरुणीने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. सहाय्यक निरीक्षक दिगंबर पगार यांच्या पथकातील राजेंद्र पेडणेकर, सूर्यवंशी, जाधव आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीडीआर काढला. त्यावरून पोलिसांनी रवीला धारावी येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केला असून तो लवकरच फॉर...

दोन वर्षानंतर येणारा गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा

गणेशोत्सव मंडळाना नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल . पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबई दि. २१-गणेशोत्सव, दहीहंडी  आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्शवभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे व्हा...

ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात आहे

काँग्रेस पक्ष अशा हुकूमशाही समोर झुकत नाही तर त्या विरोधात आरपारची लढाई लढेल.. नाना  पटोले पुणे मेट्रो लाईव्ह :   सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण  काही तथ्य नसल्याने बंद केले होते. परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनिया, राहुल हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्ष अशा हुकूमशाही समोर झुकत नाही तर त्या विरोधात आरपारची लढाई लढेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.  केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे,...

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत

  लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणा बाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची जीएसआयला सूचना  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. १९: मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (जीएसआय) सर्वेक्षण करण्याबाबत कळवले आहे. दरम्यान मुळशी धरण परिसरात नोंद झालेली कंपने भूकंपाची नसून अतिशय कमी तीव्रतेची असल्याची माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली. टाटा पॉवरने मुळशी धरण परिसरात भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाल्याबाबत प्रथमदर्शनी कळवले होते. तथापि, नोंद झालेली कंपने ही भूकंपाची नसून ४०-४२ किमी परिघामधील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरुपाच्या आघातजनक घटनांमुळे झाले असल्याचा अंदाज आहे. नोंद झालेली कंपने अतिशय कमी तीव्रतेची (०.२ जी) असल्याचे दिसून आले, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. त्यामुळे लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे जीएसआयला कळवले आहे.

मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर संजय पांडे को ईडी ने आज को गिरफ्तार कर लिया

  पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर संजय पांडे को ईडी  ने आज  को गिरफ्तार कर लिया है। उन्हें मनी लॉन्ड्रिंग एक्ट के तहत गिरफ्तार किया गया है। संजय पांडे नेशनल स्टॉक एक्सचेंज  के कर्मचारियों के फोन टैपिंग से जुड़े मनी लॉन्ड्रिंग के मामले में पूछताछ के लिए आज ईडी के सामने पेश हुए थे। उनसे बीते दिन सोमवार को भी पूछताछ की गई थी। ईडी ने सोमवार को उनसे 3 घंटे तक पूछताछ की थी।  संजय पांडे 1986 बैच के भारतीय पुलिस सेवा (आईपीएस) के अधिकारी हैं। वे 30 जून को रिटायर हुए थे। मुंबई के पुलिस आयुक्त के रूप में अपने चार महीने के कार्यकाल से पहले उन्होंने महाराष्ट्र के कार्यवाहक पुलिस महानिदेशक के रूप में भी सेवाएं दीं। उन पर आरोप है कि 2009-17 के बीच एनएसई कर्मचारियों की अवैध फोन टैपिंग की गई, जिसमें 'आईसेक सिक्योरिटीज प्राइवेट लिमिटेड' नामक कंपनी की कथित तौर पर संलिप्तता है। जांच में यह पाया गया कि संजय पांडे कंपनी के कामकाज और गतिविधियों से निकटता से जुड़े हैं। इस कंपनी ने एनएसई का सिक्योरिटी ऑडिट किया था। आईसेक सिक्योरिटीज कंपनी में मार्च 2001 में संजय पांडे ...

तिळवणी येथे लोक क्रांती विकास आघाडी हात. तालुका महिला आघाडी. संगीता आवळे यांच्या माध्यमातून विधवा महिला व शिक्षक वृंदांचा केला सन्मान करण्यात आला

पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी : आज मंगळवार दि. 19/7/22 रोजी तिळवणी येथे लोक क्रांती विकास आघाडी हात. तालुका महिला आघाडी. संगीता आवळे यांच्या माध्यमातून विधवा महिला व शिक्षक वृंदांचा  केला सन्मान करण्यात आला .  . या समारंभाच्या वेळी गावातील विधवा महिलांना लोकक्रांती विकास आघडीच्या माध्यमातून  साड्या व वृक्ष देऊन त्यांचा केला गौरव केला तसेच गावातील शिक्षकांना सुद्धा  पुस्तक व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला .  या वेळी तिळवणी चे लोकप्रिय सरपंच मा श्री राजेश पाटील उपसरपंच मा श्री दीपक गायकवाड यांच्या शुभ हस्ते साड्या व वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट रित्या नियोजन तिळवणीच्या. श्रीमंती संगीता आवळे व   कोरोची शहर अध्यक्ष श्री सलिम माणगावे  यांनी केले तसेच गावातील शिक्षकांचा सन्मान आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्ता मांजरे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले यांच्या शुभहस्ते पुस्तक व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तिळवणी गावचे सरपंच मा. श्री राजेश पाटील,मा.श्री उपसरपंच गायकवाड,...

मनसे तर्फे शालेय विद्यार्थ्यांना 10000 मोफत वह्या वाटप.

पुणे मेट्रो लाईव्ह : जीलानी उर्फ मुन्ना शेख : पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्या वतीने विभाग अध्यक्ष श्री अजय कदम यांच्या वतीने रास्ता पेठ भागामध्ये व संपूर्ण विभागांमध्ये दहा हजार मोफत वही वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी मनसे नेते बाबू वागस्कर शहराध्यक्ष साईनाथ बाबर बाळा शेडगे रणजीत शिरोळे प्रल्हाद गवळी महिला शहराध्यक्ष वनिताताई वागस्कर व परिसरातील प्रमुख व्यापारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .   कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विभागाध्यक्ष अजय कदम अनुप जाधव रवी भोसले शिरीष आगुरेड्डी रितेश सी कोत्रे हेमंत बोलगे विशाल पवार सचिन दोडके अमित सारथे सागर गोरे मयूर पाटील भूषण शिंदे कैलास परदेशी आधी सर्व शाखा अध्यक्ष उपस्थित होते. रास्ता पेठ येथे मोठ्या प्रमाणात खड्डे , तिथे वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे मतदार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या चौकामध्ये रास्ता पेठ येथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत तिथे वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला त्याप्रसंगी विभागाध्यक्ष अजय कदम अन...

RBI चे महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध ठेवीदारांना फक्त 15 हजार रुपयेच काढता येणार

पुणे मेट्रो लाईव्ह : रायगड जिल्हा  : सुनील पाटील भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर  निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त 15 हजार रुपये काढता येणार आहेत.बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचं आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, रायगड सहकारी बँकेवरील निर्बंध हे सहा महिन्यांसाठी असतील. बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना 15 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले म्हणजे त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द होणार असा त्याचा अर्थ होत नाही असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती निर्बंधांसह बँकेला बँकिंग व्यवसाय करता येऊ शकेल असेही आरबीआयने म्हटले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवदेनानुसार, बँकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्बंधांच्या निर्देशात बदल होऊ शकतात. दरम्यान, आरबीआयने बीड येथील श्री छत्रपती राजर्ष...

आजपासून (18 जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार

पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल.  नवी दिल्ली :   जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आजपासून (18 जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार ( आहेत. या मध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश  आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल. अशाप्रकारे, 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवरही जीएसटी भरावा  लागेल. याशिवाय दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने देणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर सध्या कोणताही कर नाही. १८ जुलैपासून बदल लागू :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलने गेल्या आठवड्यात आपल्या बैठकीत कॅन किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, सुका सोयाबीन, मटार, यांसारख्या उत्पादनांना मान्यता दिली आहे...

दै. राष्ट्रीय सहारा और मेरा भारत टाईम्स के रिपोर्टर जावेद शेख की ३री बरसी

“एक नूर था जो किरनों को अपनी बिखेरकर रोशनी, जहां से चला गया" मोहम्मद जावेद मौला पुणे : पुणे के मशहूर उर्दु पत्रकार और दै. राष्ट्रीय सहारा और मेरा भारत टाईम्स के सिनियर रिपोर्टर जावेद शेख की  ता. १३ जुलै २०२२ को तीसरी बरसी हाल ही मे  हो गयी, उनका ६० साल के उम्र में १३जुलै २०१९ रात ११.३० बजे स्थानिक अस्पताल में न्युमोनिया से इंतेकाल हुआ। उन्हें दो दिन पहले अस्पताल में दाखिल किया गया कादरी की हौसला अफजाई की और मेरा भारत टाईम्स के परिवार मरहूम जावेद शेख को बाबा कादरी की कमी महसूस नही होने दी। जावेद शेख बहोत ही हसमुख और मिलनसार थे। पत्रकारिता के साथ साथ वो एक दर्दमंद दिल भी रखते थे। वो बहोत ही अच्छे इंसान थे। इसलिए उनके चले जाने से दै. मेरा भारत टाईम्स का तजुर्बा उन्हें राष्ट्रीय दै. सहारा न्यूजपेपर में काम आया। २००६ को मुंबई एडीशन के सहारा अखबार के लिए पूणे से था। जावेद शेख ने उर्दू पत्रकारिता की शुरूआत एडीटर बाबा कादरी मरहूम के साप्ताहिक मेरा भारत टाईम्स से २००४ से की थी। याद रहे के अचानक १६ जनवरी २०१६ में संपादक बाबा कादरी के इंतेकाल के बाद जावेद शेख ने मेरा भारत टाईम्स को अपनी ...