Skip to main content

Posts

आजपासून (18 जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार

पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल.  नवी दिल्ली :   जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आजपासून (18 जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार ( आहेत. या मध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश  आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल. अशाप्रकारे, 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवरही जीएसटी भरावा  लागेल. याशिवाय दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने देणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर सध्या कोणताही कर नाही. १८ जुलैपासून बदल लागू :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलने गेल्या आठवड्यात आपल्या बैठकीत कॅन किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, सुका सोयाबीन, मटार, यांसारख्या उत्पादनांना मान्यता दिली आहे...

दै. राष्ट्रीय सहारा और मेरा भारत टाईम्स के रिपोर्टर जावेद शेख की ३री बरसी

“एक नूर था जो किरनों को अपनी बिखेरकर रोशनी, जहां से चला गया" मोहम्मद जावेद मौला पुणे : पुणे के मशहूर उर्दु पत्रकार और दै. राष्ट्रीय सहारा और मेरा भारत टाईम्स के सिनियर रिपोर्टर जावेद शेख की  ता. १३ जुलै २०२२ को तीसरी बरसी हाल ही मे  हो गयी, उनका ६० साल के उम्र में १३जुलै २०१९ रात ११.३० बजे स्थानिक अस्पताल में न्युमोनिया से इंतेकाल हुआ। उन्हें दो दिन पहले अस्पताल में दाखिल किया गया कादरी की हौसला अफजाई की और मेरा भारत टाईम्स के परिवार मरहूम जावेद शेख को बाबा कादरी की कमी महसूस नही होने दी। जावेद शेख बहोत ही हसमुख और मिलनसार थे। पत्रकारिता के साथ साथ वो एक दर्दमंद दिल भी रखते थे। वो बहोत ही अच्छे इंसान थे। इसलिए उनके चले जाने से दै. मेरा भारत टाईम्स का तजुर्बा उन्हें राष्ट्रीय दै. सहारा न्यूजपेपर में काम आया। २००६ को मुंबई एडीशन के सहारा अखबार के लिए पूणे से था। जावेद शेख ने उर्दू पत्रकारिता की शुरूआत एडीटर बाबा कादरी मरहूम के साप्ताहिक मेरा भारत टाईम्स से २००४ से की थी। याद रहे के अचानक १६ जनवरी २०१६ में संपादक बाबा कादरी के इंतेकाल के बाद जावेद शेख ने मेरा भारत टाईम्स को अपनी ...

नागरिक सुपात व मनपाचे पदाधिकारी तुपात

 इचलकरंजी : मनु फरास :   इचलकरंजी महानगरपालिका मधील  सर्व पदाधिकारी वर्षानुवर्षे एकाच खात्यात एकाच टेबलावर ठाण मारुन बसलेले आहेत. त्यांची बदली होतच नाही , ते मनपाचे जावई  आहेत असे वाटू लागले आहे यांच्या मागे कोण आहे ?  कोणाचा आशिर्वाद आहे ..?  हे गुपीतच आहे . नागरिकांची कामे होत नाहीत ,  नागरिक सुपात व  मनपाचे पदाधिकारी तुपात अशी परिस्तिथी आहे  ,  एखाद्या कामासाठी  जर महापालिकेत जाण्याची वेळ आली तर बरोबर माहिती ने देणे , हे काम माझे कडे  नाही , तुम्ही या मोबाईल नंबर वर फोन करा , त्याला फोन केला तर या म्हणतात गेल्यावर हे काम माझे कडे नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकून टाकतात. अशा सर्व प्रकारा मुळे सर्व सामान्य नागरिक वैतागलेले आहेत.    त्यामुळे या बाबत आयुक्तांनी लक्ष घालण्याची जास्त गरजेचे आहे . तसेच एकाच ठिकाणी सर्व पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत त्यांची पण आता चौकशी झाली पाहिजे   तरच सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल व त्यांची कामे सुद्धा होतील.

जल्द ही शिंदे गुट और उद्धव गुट में होगी सुलह: दीपाली

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेता दीपाली सय्यद ने ट्विटर पर बड़ा दावा किया है। उन्होंने कहा है कि जल्द ही शिंदे गुट और उद्धव गुट में सुलह हो जाएगी और इसमें बीजेपी मदद कर रही है। मराठी भाषा में किए गए ट्वीट में दीपाली ने लिखा, ' आने वाले दो दिनों मे उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे शिवसैनिकों की भावनाओं का आदर करते हुए पहली बार चर्चा के लिए एक साथ आएंगे, यह जानकर बहुत अच्छा लगा। एकनाथ शिंदे ने शिवसैनिकों की भावना समझी और उद्धव ठाकरेने परिवार के मुखिया होने के नाते ये बात दिल से निभाई, यह स्पष्ट हो गया है। इस मध्यस्थता के लिए भाजपा नेताओं ने मदद की, इसके लिए भी धन्यवाद। चर्चा कहां होगी अब उस जगह का इंतजार रहेगा । शिवसेना के बागी विधायकों ने गुवाहाटी में गुजारा बेहद मुश्किल समय: शिंदे बता दें कि इससे पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शनिवार को कहा था कि उनके साथ गुवाहाटी गए शिवसेना के बागी विधायकों ने बेहद मुश्किल और तनावपूर्ण समय बिताया। शिंदे ने कहा कि विधायकों ने जब अपने विद्रोह के बाद विभिन्न घटनाओं से संबंधित खबरें टीवी पर देखीं तो वे बेहद तनाव में आ गए और उनका वह समय बेहद ...

बेडकिहाळ येथे डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारोंच्या उपस्थितीत दिमाखात साजरा

बेडकिहाळ येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद,            शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम. पुणे मेट्रो लाईव्ह :   बेडकिहाळ, ता,१६,  येथील कै बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या  वतीने शुक्रवार (ता १५) रोजी श्रीमती कुसुमावती  मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विविध रोग तपासणी शिबिरास बेडकिहाळ सह परिसरातिल नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.        स्वागत शिंगाडे सेवाभावी संस्थेचे  संस्थापक डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले, तर अजित कांबळे यांनी प्रास्ताविकात शिंगाडे चॅरिटेबलच्या वतीने  वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांनची सविस्तर पणे माहिती करून दिली.   या शिबिरा प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून  अनुराधा पाटील, पीएसआय (पालघर मुबंई,) डॉ सुनीता पाटील (सांगली )  कृषी पंडित सुरेश देसाई,, डॉ सुरेश कुराडे, (गडहिंग्लज) कारदगा ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे, समाजकल्याण आधिकारी जे के पम्मार, आण्णा पाटील, आदी उपस्थीत होते.     उपस्थीत सर्...

पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर होऊ लागली

सध्यस्थिती पाहता पुराचा धोका टळल्याच दिसत आहे.  पुणे मेट्रो लाईव्ह :   कोल्हापूर : गेल्या आठवडाभरा पासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. आता गेल्या २४ तासापासून जरा पाऊस ओसरू लागला आहे. त्यामुळे सध्यस्थिती पाहता पुराचा धोका टळल्याच दिसत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर होऊ लागली आहे. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे .  कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून घट होऊ लागली आहे. तसेच आठवडाभर गायब असलेल्या सूर्याचे दर्शन झाल्याने आणखी दिलासा मिळाला. आज सकाळी 10 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 37 फुट 9 इंच इतकी होती. पंचगंगेची इशारा पातळी 39 आहे, तर धोका पातळी 43 फुट आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरणातून (almatti dam) आज सकाळी सकाळी 10 वाजल्यापासून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याआधी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर धरण प्रशासनाने धरणका...

इचलकरंजी पञकार कवि मंचच्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्कृष्ट काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मिळवली वाहवा. पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी / प्रतिनिधी इचलकरंजी येथे इचलकरंजी पञकार मंचच्या वतीने नवोदित कवी - कवयिञींसाठी आयोजित केलेल्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सहभागी कवींनी सामाजिक आशयावर आधारित उत्कृष्ट काव्य सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. इचलकरंजी शहर परिसरातील नवोदित कवी - कवयिञींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने इचलकरंजी येथे श्रमिक पत्रकार संघ व इचलकरंजी प्रेस क्लब या दोन्ही संघटनांच्या वतीने  इचलकरंजी पञकार कवी मंचच्या माध्यमातून महापालिकेच्या पञकार कक्षामध्ये काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर स्वागत व प्रास्ताविकात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत चांगले साहित्यिक व कलाकार घडवण्यासाठी यापुढेही निश्चित प्रयत्न राहिल ,अशी ग्वाही दिली. यानंतर सहभागी कवी - कवियञींनी   महापुर , शेतकरी , कष्टकरी ,वृक्षतोड , माणुसकी,शिक्षण , स्वच्छता , पाऊस, स्वातंत्र्य , दुरावलेले नात...

पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पाहणी

संभाव्य पूरबाधितांच्या निवारागृहांमधील सेवा- सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये....    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना   प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांचे आश्वासन पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर :  (जिमाका): संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सलग वाढ होत असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पूरबाधितांसाठी नियोजित निवारागृहांमधील सेवा सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्तांसाठीच्या नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिवसभर पाहणी करुन पदाधिकारी, नागरिक, ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर शिरोळ तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पूरपरिस्थिती नियोजन बैठक घेण्यात आली, यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.  जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, निवारागृहांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, आरो...

पंचगंगा नदीवरील पाणी पुलावर आल्याने शिरढोण कुरुंदवाड संपर्क तुटला

शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला शिरढोण : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिरढोण- कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर बुधवारी सकाळी पाणी आले आहे. त्यामुळे शिरढोण कुरुंदवाड संपर्क तुटला आहे. तर शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला आहे. दरम्यान पुराच्या पाण्याला गती असल्याने व त्या पाण्यातून वाहतूक सुरु असल्याने कुरुंदवाड पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरीकेटस लावून वाहतूकीसाठी रस्ता बंद केला आहे. वाहतूक रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, मंडल अधिकारी डी. बी. गायकवाड, तलाठी रवी कांबळे, पोलिस पाटील अनुराधा जाधव, सरपंच बाबू हेरवाडे रस्त्यावर गस्त घालत होते.इंचलकरंजीहून  कुरुंदवाडला जाण्यासाठी शिरढोण मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक असते. मात्र पुलावर पाणी आल्याने व पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा ते बारा किलोमीटर परत जावून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे क...

पुणे आणि परिसरात आगामी चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत पुणे मेट्रो लाईव्ह : जीलानी उर्फ मुन्ना शेख :   पुणे आणि परिसरात आगामी चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पुढील तीन दिवस शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.या आदेशानुसार, गुरुवार, 14 जुलै 2022 ते रविवार, 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पर्यटक, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनस्थळावर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या पर्यटनस्थळांवर कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.कोणकोणत्या ठिकाणी आदेश लागू ? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार खालील पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू असेल असे असतील प्रतिबंध पाच किंवा पाच ...