Skip to main content

Posts

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त प्रभात फेरी

बरसत्या जलधारांच्या साक्षीने हाती तिरंगा घेत पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि.१०- ‘वंदे मातरम्, वंदे मातरम्’ ... भारत माता की जय… हर घर तिरंगा'… अशा घोषणांमधून प्रकटणारी देशभक्तीची भावना.. युवक, महिला व लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हाती असलेला तिरंगा…. देशभक्तीच्या भावनेला जोरदार पावसाच्या जलधारांनीही बरसत  दिलेली साथ....अशा उत्साहाच्या वातावरणात पुणेकर नागरिकांनी पावसात उत्साहाने प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवला. विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत या प्रभात फेरीचा समारोप झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी हवेली आणि त्याअंतर्गत हवेली, पुणे शहर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती पुणेच्या सहकार्याने आज सकाळी मामलेदार कचेरी येथून शुभारंभ झालेल्या प्रभात फेरीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभात फेरीच्या मार्गावरील नागरिकही प्रभात फेरीत सहभागी होत गेल्याने रॅलीतील उत्साह वाढला. पावसातही हातात तिरंगा घेऊन नागरिक भारतमातेचा जयघोष करीत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यका...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून नगरपरिषद करावी

    नागरिकांची मागणी ; सागर लांगे यांचा सातत्याने पाठपुरावा   पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख देहूरोड कॉंटमेंट बोर्ड ऐवजी नगरपरिषद होण्याबाबत मागील सहा महिन्यापूर्वी सागर कृष्णा लांगे (भाजप प्रणित: नवभारतीय शिव वाहतूक संघटना, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय सर्वसामाजिक संस्था धार्मिक संघटना व देहूरोड मधील सर्व नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, विद्यमान मुख्यमंत्री, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डा चे कार्यकारी अधिकारी स्थानिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे स्थानिक आमदार तसेच शासकीय संबंधित खात्याचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व त्याचा सागर लांगे , यांचे सहकारी यांच्या माध्यमातून वेळोवेळी सर्वांकडे पाठपुरावा करत आहेत मा. अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग, भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष  हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली रंगशारदा सभागृह मुंबई या ठिकाणी *हर घर तिरंगा अभयानाअंतर्गत* कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये देहूरोड कॉंटमेंट बोर्डचे रूपांतर नगरपरिषदे मध्ये होण्याकरता कार्यक्रमांमध्ये उपस्थित ...

कोंढव्यातील सांस्कृतिक सभागृहे उघडण्यासाठी आंदोलन

  इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे उपायुक्तांना निवेदन  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : स्थानिक सर्व माजी नगरसेवकांच्या वर्चस्वाच्या लढाईत पुणे महानगरपालिकेने बंद केलेली  कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगर आणि शिवनेरी नगर मधील सांस्कृतिक सभागृहे (फंक्शन हॉल)पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप आणि कोंढव्यातील नागरिकांनी पुणे महापालिकेसमोर आंदोलन केले आणि पालिकेच्या समाजकल्याण विभागाचे उपायुक्त आर.आर.चव्हाण यांना निवेदन दिले. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले.   पालिकेने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्न समारंभाकरीता शिवनेरीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि साईबाबा नगर येथे इमाम अबू हनीफा नावाने सांस्कृतिक सभागृह (हॉल ) बांधण्यात आले आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिक त्याचा वापर करतात. येथील स्थानिक माजी नगरसेवकांनी स्वतःच्या वर्चस्वासाठी सभागृहाचा वापर केला आणि किल्ली स्वतःजवळ ठेवून अडवणूक केली. पालिकेने प्रशासकीय काळात हि सभागृहे बंद करून ठेवली आहेत.त्यामुळे स्थानिक ...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि. ८ - अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील   खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो भेसळयुक्त गुळ तर ८२ हजार ४४० रुपये किंमतीची २ हजार ७५० किलो भेसळयुक्त साखर जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर  कारवाई करण्यात येत आहे.  जानेवारी २०२२ मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकुन ३ लाख ६७ हजार ९०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार १६२ किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये हातवळण येथील गुळ उत्पादकावर धाडी टाकुन गुळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी घेण्यात आलेले घेण्यात आलेले नमुने असुरक्षित असल्याचे घोषीत करण्यात आल्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. जप्त केलेली साखर नष्ट करण्यात आली आहे. जुलै २०२२ मध्ये गुऱ्हाळ घरांना भेसळीसाठी पुरविण्यात येणारी ७ लाख ७५ हजार रुपये किंमतीची सुमारे २५ हजार किलो साखर जप्त करण्यात आली ...

तीन सदस्यांची प्रभाग पद्धतीच रद्द झाल्याने आतापर्यंत मतदारयादीवर झालेला खर्च वाया गेला..

  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची तीनच्या प्रभागानुसार तयारी सुरू करण्यात आली. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर महापालिकेने मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू केले होते. ३१ मे २०२२ पर्यंत शहरात ३४ लाख ५४ हजार इतकी मतदारसंख्या निश्चित करण्यात आली, या मतदारांची प्रभागनिहाय फोड करून प्रारूप मतदारयादी जाहीर केली. प्रभागरचना अंतिम झाली तरी आपल्या हक्काचे मतदार आपल्या प्रभागात आहेत, की दुसऱ्या प्रभागात गेले याची चिंता इच्छुक उमेदवारांना असते. तीनचा प्रभाग करताना सरासरी एका प्रभागाचे मतदार ५५ हजार इतके होते. प्रारूप मतदारयादीचा अभ्यास करण्यासाठी निवडणूक शाखेच्या कार्यालयातून मतदारयाद्या विकत घेण्यात आल्या, त्यासाठी प्रति पान दोन रुपये इतके शुल्क घेण्यात आले. काही जणांनी थेट पेनड्राइव्हद्वारे मतदारयाद्या घेऊन त्यांचा अभ्यास सुरू केला. यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांचा समावेश होता. नागरिकांचा प्रभाग बदलण्यात आल्याने इच्छुकांच्या पाया खालची वाळू सरकली होती. यावर सुमारे ५ हजार हरकती घेतल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात येऊन अंतिम मतदारयादी जाहीर केली.महापालिकेने मतदारयादी, व...

हर घर तिरंगा ' योजनेत चिनी गालबोट नको ...भारत फ्लॅग फाउंडेशनचे आवाहन

पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगी झेंडे लावण्याचा संकल्प केला जात असून ' हर घर तिरंगा ' संकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये  चीन वरून तयार झालेले  झेंडे वापरून देश प्रेमाला गालबोट लावू नये, असे आवाहन भारत फ्लॅग फाउंडेशनने केले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे आवाहन करण्यात आले आहे.  चिनमधून आलेले  तिरंगा ध्वज कोणी विकू नये ,खरेदी करू नये, कारण हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. चीन वरून आलेल्या झेंड्यांना बंदी केली पाहिजे . तशा आशयाचा संदेश फाउंडेशनने तयार केला असून तो नागरिकांनी डीपी, स्टेटस म्हणून सोशल मीडियावर ठेवावा ,असे आवाहन देखील फाउंडेशनने केले आहे भारतामध्ये सर्वसामान्य कारागीर, गरीब कुटुंबे, छोटे कारखानदार ध्वज निर्मिती करत असतात. बचत गटांमध्ये महिला हे काम करतात. चीन मधून आलेल्या झेंड्यांमुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ,सामाजिक संस्था मोफत ध्वज वाटप करत आहेत. त्यांनी देखी...

सेल्स गर्ल ते उद्योजक

पुणे:  नुकताच व्यवसाय क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगवी, पुणे येथील श्रीमती संध्या दीपक फाकटकर यांना" उद्योगिनी व्यवसाय गौरव पुरस्कार  २०२२" ने सन्मानित करण्यात आले.  श्रीमती संध्या फाकटकर या गेले १८  ते  २० वर्ष फर्निचरच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए .हिंदी व बी.एड.आहे.त्यानंतर त्यांचे लग्न झाले. एकत्रित कुटुंब व्यवस्था असल्याने व पती एकटेच कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने घरामध्ये आर्थिक अडचण होती. परंतु स्वतःच्या शिक्षणाचा कुटुंबासाठी काहीतरी उपयोग व्हावा ही  देखील इच्छा होती.  सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षक पदासाठी नोकऱ्यांचा शोध सुरू केला. परंतु यामध्ये अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता घरामध्ये पाचवी ते दहावी शिकवण्या सुरू केल्या. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची परिस्थिती देखील बेताचीच. त्यामुळे अगदी अल्प प्रमाणात शिकवणीचे शुल्क घेतले जायचे. महिन्याकाठी त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यास ५०  रुपये शुल्क आकारले जायचे. परंतु एक- दोन वर्ष असेच चालत राहिले. संसाराचा आर्थिक गुंता काही...

निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति...

 " अभिज्ञा  म्हणाली बाबा म्हणून मोठया प्रमाणात झाडं लावली पाहिजे"            कव्हर स्टोरी....       एका लहान मुलीची पर्यावरणाच्या  प्रती उत्तम कामगिरी अन्वरअली शेख पुणे मेट्रो लाईव्ह  देहूरोड दि.६ निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति प्रेम भावना व निसर्ग निर्मितीच्या महान कार्यात मग्न अशी ही देहूरोड शहराच्या केंद्रीय विद्यालय नंबर १.तिसरी  मध्य शिकत असताना पर्यावरणाची काळजी घेतली आणि पर्यावरण संवर्धन, निसर्ग रक्षणाच्या बाबतीत,तेसच मानवतेच्या दृष्टीकोनातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिला (नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थने ) कार्याची दखल घेऊन कु.अभिज्ञा पंकज तंतरपाळे यांना संस्थच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे.   कु अभिज्ञा ची निसर्ग प्रति प्रेमाची कहाणी मागील दोन वर्षांपूर्वी जन्माला आली संपूर्ण जग कोरोना या भयंकर महामारी-शी झुंजत होता भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती,अनेक निष्पाप लोकं या आजारा मुळे मरण पावले,र...

हर घर मे तिरंगा आणि देश प्रेम

पुणे मेट्रो लाईव्ह : आजादी का अमृत महोत्सव  अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022  प्रत्येक घर ,ऑफीस ,शाळा सगळ्या ठिकाणी तिरंगा उभारण्यासाठी घर घर  तिरंगा अभियान चालवण्यात येत आहे त्याबद्दल काही गोष्टी मला मनापासून वाटतात .त्या आपल्या सोबत शेअर करत आहे .  घर घर तिरंगा याअंतर्गत प्रत्येक घर ,ऑफिस, शाळा या ठिकाणी तिरंगा आपण फडकवणार आहोत पण ह्या तिरंग्याचा अभिमान फक्त दोन दिवसासाठी आहे का ? आणि दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑगस्टला त्या तिरंग्याचे काय होणार?  काही तिरंगे हे कागदी असतील, काही तिरंगे हे प्लास्टिकचे असतील, काही तिरंगे हे कापडाचे असतील पण दोन दिवसांचे अभियान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या तिरंग्याच काय होणार..? तर मला असे वाटते की ...दोन दिवसाचे घर घर तिरंगा अभियान झाल्यानंतर पुढे तो तिरंगा रस्त्यावर फेकला जाऊ नये, तिरंगा कोणाच्या पाया खाली येता कामा नये .तिरंग्याचा अवमान होता कामा नये असे मला वाटते .त्यामुळे घर घर तिरंगा ठीक आहे पण प्रत्येक घराघरातील माणसाच्या मनामध्ये तुम्ही तिरंगा कसा फडकवणार ?फक्त दोन दिवस घरावरती तिरंगा फडकवून खरंच देशप्रेमाची ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील 23 महापालिका

  निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभागरचना व आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली. पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २३ महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना व आरक्षण सोडतीबाबत झालेली सर्व प्रक्रिया रद्द करण्यात यावी. जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत निवडणूक संदर्भात कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेली असून निवडणुकीची प्रभागरचना व आरक्षण सोडत नव्याने करण्यात याव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभागरचना केली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाच्या कचाट्यात आडकल्यानंतर ओबीसींना वगळून आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाचे व महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले. ओबीसींचा समावेश करून नव्याने सोडत ...